Tuesday, October 25, 2016

सुख, समाधान व समृध्दी देणारा वर्सी महोत्सव


जळगाव शहरातील संत कंवरराम नगर हे रहिवासाचे मूळ असलेल्या व संपूर्ण जगभरात विस्तारलेल्या सिंधी समाजाच्या जळगाव येथील पवित्र तीर्थस्थानी दि. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान तीन संतांचा वर्सी महोत्सव उत्साहात साजरा झाला. यावर्षी यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. यात सर्व जाती धर्माचे भाविक होते. पूज्य अमर शहिद संत कवंरराम साहब, पूज्य संत हरदासराम साहब (गोधडीवालेबाबा) आणि पूज्य ब्रह्मस्वरुप संत गेलाराम साहब यांच्या समाधीस्थळी देशभर व जगभरातून किमान लाखभर सिंधी बांधव आले. अगदी लहान मोठ्या व्यक्तिने या ४ दिवसांच्या धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उत्सवाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतला. उत्सवाची हीच बाजू लक्षवेधी आणि त्याचे महात्म्य स्पष्ट करणारी आहे.

Tuesday, October 18, 2016

वर्सी महोत्सव एक तीर्थस्थाम महात्म्य



संपूर्ण जगभरात विस्तारलेल्या आणि ज्यांचे भारतातील रहिवासाचे मूळ जळगाव आहे अशा सिंधी समाजाचे एक पवित्र तीर्थस्थान जळगाव शहरात आहे. जळगाव येथील सिंधी कॉलनीत (संत कंवर नगर) पूज्य अमर शहिद संत कवंरराम साहब, पूज्य संत हरदासराम साहब (गोधडीवालेबाबा) आणि पूज्य ब्रह्मस्वरुप संत गेलाराम साहब यांचा वर्सी महोत्सव बुधवार (दि. १९) पासून सुरू होत आहे. हा महोत्सव चार दिवसांचा म्हणजे शनिवार (दि. २२) ऑक्टोंबरपर्यंत साजरा होईल. या तीनही पूज्य संत साहब यांच्या कार्याची आठवण म्हणून दरवर्षी हा वर्सी महोत्सव साजरा होतो. 

Saturday, October 8, 2016

सामान्य रुग्णांचा होमिओपॅथीवर वाढता विश्वास


केंद्र शासनाने सरकारी रुग्ण सेवा लोकाभिमुख करण्यासाठी खास आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा एक भाग म्हणून सर्व सामान्य रुग्णांना त्यांच्या विश्वासाची आरोग्य सेवा देण्यासाठी आयुष मंत्रालयाची सेवा  विस्तारण्यात आली आहे. जवळपास सर्वच जिल्हा रुग्णालयांमध्ये आयुष सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून प्रचलित वैद्यकिय सेवेसह इतरही चिकित्सा पद्धतींवर विश्वास ठेवून रुग्ण उपचार करुन घेत आहेत. 

Monday, September 19, 2016

अर्ध मॅरेथॉनचे स्वप्न अखेर पूर्ण ...


आरोग्यासाठी चालणे, धावणे याचा सराव व्यक्तिगत पातळीवर मी करीत आलो आहे. मला स्वतःला सकाळी चालण्याची सवय होती. मात्र, जळगावमधील काही मित्रांच्या संपर्कात मी आलो आणि पाच-सात जणांचा रनर्स गृप तयार केला. जेव्हा गृप तयार केला तेव्हा धावण्याच्या शर्यतीत किंवा मॅरेथॉन वगैरेत सहभागाचे काही उद्दिष्ट नव्हते. आमच्या गृपमधील नरेंद्र सोलंकी यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर किरण बच्छाव यांनीही तसा यशस्वी प्रयत्न केला. नंतर मी त्यातून प्रेरणा घेवून बंगळुरू येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग घेतला. दरम्यानच्या काळात आमचा रनर गृप १०० सदस्यांच्या वर गेला होता.

Friday, September 9, 2016

माझ्या जिवनातील गुरु


डॉ. ढोलेसर
शिक्षकदिन नुकताच साजरा झाला. माझ्या आयुष्यातील काही गुरुंना त्याच दिवशी अभिवादन करणारा मजकूर लिहायचा होता. मात्र, नियमित कार्याच्या गडबडीत ते शक्य झाले नाही. शिक्षकदिनाच्या निमित्त मी आयुष्याकडे मागे वळून बघितले. तेव्हा असे लक्षात आले की, लहानपण, शिक्षण, व्यवसाय, मित्र परिवार आणि कुटूंब अशा विविध क्षेत्रात काही ना काही शिकवणारे अनेक गुरु माझ्या आयुष्यात आहेत. माझ्या व्यक्तिमत्वाला, माझ्या प्रतिष्ठेला आणि माझ्या सामाजिक प्रभावळीला आकार, ओळख देणारे अनेक जण माझ्या आयुष्यात गुरू म्हणून आहेत. त्यातील बरीच मंडळी कुटुंबाच्या बाहेरील असून मित्र परिवारातील आहेत. माणूस खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत शिकत असतो. त्याच क्रियेतून त्याचा मित्र परिवार वाढतो.

Sunday, September 4, 2016

रनर कल्चर झिंगाट ...!!!


जळगाव शहरात धावणाऱ्यांचे म्हणजे रनर कल्चर आता फोफावते आहे. अगदी नव्या भाषेत म्हणायचे तर रनर कल्चर झिंगाट होते आहे. जेव्हा आम्ही जळगाव रनर्स गृप तयार केला तेव्हा मोजकेच सहकारी होते. आता ही संख्या दिवसागणिक वाढून जवळपास १११ पर्यंत पोहचली आहे. एखाद्या शहराचा सांस्कृतिक तथा समाजिक चेहरा ठरवायचा असेल तर त्यात फिटनेससाठी जागरुक असलेल्यांचीही विचार करावा लागतो. अशा मापदंडात जळगाव रनर्स गृप चे योगदान निश्चित लक्षात घ्यावे लागेल.

Wednesday, August 24, 2016

आत्मशांताचे थदडी पर्व


प्रत्येक जाती-धर्मात देवादिकांच्या शांतीचे आराधना पर्व साजरे केले जाते. कुलदैवताच्या प्रसन्नतेसाठी आणि कौटुंबक सौख्यासाठी पूर्वजांनी काही सण-उत्सवांची रचना केली आहे. नैसगिर्क आपत्ती व कोप हा देवादिकांच्या नाराजी, रागातून होतो अशा भ्रामक समजुती पूर्वी होत्या. त्या आजही आहे. ज्ञान-विज्ञानाच्या कसोटीवर अनेक रुढी-परंपरा कालबाह्य असल्या तरी त्यांचे कौटुंबिक एकत्रिकरणाचे व समाजाची ओळख म्हणून असलेले महत्त्व कमी झालेले नाही. उलटपक्षी अशा रुढी-परंपरांचे पालन सातत्याने केले जात आहे.