Showing posts with label वैद्यकिय. Show all posts
Showing posts with label वैद्यकिय. Show all posts

Wednesday, November 9, 2016

होमिओपॅथीसाठी रुग्ण इतिहास का महत्त्वाचा ?



विविध प्रकारच्या वैद्यकिय चिकित्सांच्या संदर्भात काही ना काही आक्षेप सातत्याने घेतले जातात. काही आक्षेप हे होमिओपॅथी विषयी सुद्धा आहेत. त्यात प्रामुख्याने होमिओपॅथी ही वेळ घेणारी आणि दीर्घकाळ सुरू ठेवावी लागणारी उपचाराची पद्धती आहे, असे सर्वसामान्यपणे मानले जाते. याशिवाय, होमिओपॅथीचे उपचार करणारे डॉक्टर रुग्णांचा इतिहास जाणून घेताना खूप प्रश्न विचारतात असाही एक गैरसमज आहे. त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे समर्पकपणे देवून रुग्णांच्या व इतर सामान्य लोकांच्या मनांत होमिओपॅथीविषयी जागरुकता व विश्वास निर्माण करणे आवश्यक झाले आहे.

Saturday, June 18, 2016

कॅन्सर निवारक बॅनर्जी डॉक्टर पितापूत्र


डॉ. प्रसंता बॅनर्जीसोबत डॉ. रवी हिरानी
होमिओपॅथीचा उपयोग बहुतांश रुग्णांवर गुणकारी असतो. अगदी जुनाट आजार बरा करण्याविषयीचे अनेक संदर्भ होमिओपॅथी उपचार पद्धतीत सांगितले जातात. माझाही या व्यवसायातील असाच सकारात्मक अनुभव आहे. मला पूर्वीपासून होमिओपॅथीच्या माध्यमातून आव्हानात्मक आजार बरे करण्याचा छंद आहे. सर्वाधिक धोकादायक आणि अती वेदनादायी आजार म्हणून कॅन्सरतथा कर्करोगकडे पाहिले जाते. हा आजार झाला आहे, असे समजल्यावर अर्धे आयुष्य गमावल्याची भावना रुग्णाची होते. हा आजार आहे सुद्धा तसा. खुप वेदनादायी आणि माणसाचे जीवन हादरवून टाकणारा.

Wednesday, May 4, 2016

प्रतिक्षेचा काळ महत्त्वाचा




डॉ. श्रीरंग ढोलेसर आणि डॉ. हिराणी
कोणत्याही प्रकारच्या खासगी व्यवसाय, सेवेत प्रत्यक्ष पाऊल टाकल्यानंतर तेथे तुमचे अस्तित्त्व तयार होण्यासाठी किंवा तुमची ओळख निर्माण होण्यासाठी प्रतिक्षेचा काळ जावू द्यावा लागतो. त्यालाच आजच्या व्यावहारिक भाषेत वेटींग पीरियड म्हणतात. ज्या - ज्या व्यवसायात कौशल्ये आहेत, जनतेसाठी त्या कौशल्यांची सेवा द्यायची आहे, त्या त्या क्षेत्रात हा प्रतिक्षेचा काळ असतोच. फरक एवढाच की, तो कोणासाठी जास्त असतो तर कोणासाठी कमी असतो. माझ्यासाठी हा प्रतिक्षेचा काळ सर्वसाधारण राहिला.